02/03/2023
०१ मार्च २०२३ आंतरराष्ट्रीय कचरावेचक दिनानिमित्त स्त्री मुक्ती संघटना, परिसर सखी विकास संस्था, व नूतन को - ऑपरेटिव्ह यांचा संयुक्त विध्यमाने निर्धार मेळावा अर्थात रोजगार उपलब्ध ह्या विषयावर संवाद साधण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्रमिक जनता संघचे सरचिटणीस जगदीश खैरलिया, उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती दिक्षित देव सीएसआर एक्झिटिव्ह बिसलरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, श्री सुरेंद्र जडयार शिधावाटप अधिकारी व स्त्री मुक्ती संघटनेचे अध्यक्ष वृषाली मगदूम, नूतन को - ऑपरेटिव्हचे अध्यक्षा मंगला दांडगे, परिसर सखी विकास संस्थाची अध्यक्षा रुक्मिणी पॉल आणि इतर सहकारी व कर्मचारी उपस्थित होते. वी नीड यु संस्थेच्या अध्यक्षा लतिका सुमो, समता विचार प्रसारक संस्थेचे सचिव अजय भोसले, सहसचिव अनुजा लोहार, म्युज फाऊंडेशन चे सदस्य मोहित हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून सावित्रीबाईंची ओवी म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह्यांच्या परिचय करून देण्यासाठी संगीता ताईने केली. परिसर सखी विकास संस्थेच्या अध्यक्षा रुक्मिणी पॉल ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कचरावेचून, कचऱ्यातूनच आपली निर्मिती करताना त्यांनी आपल्याच मुलीला ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करत त्यांचे शिक्षण पूर्ण केले. पूर्वी आजी - आजोबा व अगोदरचे काही व्यक्ती अगोदर मार्केटमध्ये कचरा हा माल म्हणून विकला जात होता व त्या बदल्यात मोबदला देखील मिळत होता. आणि कचरावेचकांनीच कच्चा माल म्हणून कचरा मार्केटमध्ये आणला. तेव्हा हे मार्केट वाले अनेक मोबदला उपलब्ध करून देत होते नंतर हे मार्केट वाले कुठे गेले होते. कचरा पुनर्निंबित करणे हा काय उपाय आहे का ? त्यांना रोजगार उपलब्ध करावे ? अनेक प्रवक्ते सफाईकर्मचारी व कचरावेचक कर्मचाऱ्यांचे नाव घेऊन मोठं मोठ्याली भाषण करून आश्वासन देतात त्यात त्यांना हिणवले जाते कचरावेचक, चोर, गुन्हेगार, व अपशब्दाने देखील संबोधले जातात. औरंगाबाद येथील घटना सांगितली सकाळी ०७ : ०० ते रात्री ९ : ०० पर्यंत कचरा दिला जातो पुन्हा रात्री देखील अंधारात शोधावा लागतो. तो कचरापुन्हा गोळा करण्यासाठी रात्री ०९ : ०० ते सकाळी ०७ :०० वाजेपर्यंत हा कचरा गोळा केला जातो पण अनेकांना कचरा मिळत नाही व कचरा ओळखण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक विभागात अनेक लाईट नसणे, हॉटेल्स मध्ये जाऊन विनंती करणे, जमा करणे, मॉल मध्ये जावे लागतात. शासनाचे नियम. काही ठिकाणी तर चोर म्हणून देखील त्यांच्यावर आरोप केला जातो. त्यांना पोलिसात कोठडी टाकल्या जातात. त्यांच्यावर बेकायदेशीरपणे कोणतेही कलमे लागू करतात व त्याची अंमलबजावणी केली जाते ह्याच मार्गातून मुलं पुढे व्यसनाकडे वळतात, शिक्षण, रोजगार नाही, बालविवाह, आंतरजातीय विवाह, प्रेम विवाह अशा अनेक समस्यांना बळी पडतात व अनेक समस्यांना बळी पडतात व त्यातून नवीन उत्पत्ती तयार देखील त्याच पद्धतीने होते लोक अनेक भाषणामध्ये बोलतात की आम्ही हे उपक्रम करू. या सुविधा त्या सुविधा करू पण जे बोलतात त्यांना लावून धरत नाहीत. जमत नसेल तर सरकार सोडा असे देखील त्या म्हणाल्या. आशा कचरावेचक महिलांना व इतरांना जर सार्वजनीक सामाजिक संस्था एकत्र काम करीत असेल व त्याना मदत करीत असेल, तर सरकार काय काम करत व कोणासाठी ? हा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले. एक व्यक्ती जर दिवसाला ५० किलो कचरा गोळा करत असेल तर १५०० महिला यांनी जमा केले तर तीन टन च्या आसपास हा कचरा जमा केला जातो आणि तो विक्रीस देखील उपलब्ध केला जातो सामाजिक संस्थेतून मिळालेल्या मदतीने अनेक कचरावाचकांची मुले हॉटेल मॅनेजमेंट, शिक्षक, mpsc परीक्षा तयारी व इतर कामासाठी सहभाग तसेच अनेक कंपन्यांमध्ये त्यांना नोकरी देखील मिळतात व त्या नोकरीतून मिळालेला संधीचं सोनं करतात आणि मिळालेल्या पैशातून किंवा पगारातून या संस्थेला देखील पुन्हा ते निधीतून आपलं सामाजिक कर्तव्य बजावत असतात.
लतिका सुमो ह्यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाल्या की, कचरावेचक महिलांमुळे कचऱ्याचे विघटन, वर्गीकरण होते तेही कोणतेही मानधन न घेता या कचरा वेगळा करण्याचे काम महिला करत असतात. कचरावेचक व सफाई कर्मचारी हे डॉक्टरा पेक्षाही मोठा असतो, कारण स्वच्छता हे लोकं ठेवतात. आणि त्याच्यामुळेच कोणतेही रोगराई पसरण्यास आळा बसतो. " श्रमाला प्रतिष्ठा नाही असे महात्मा गांधीजी म्हणतात " . "शिक्षणाला हात द्या भविष्याला साथ द्या" अशा अनेक प्रश्नांवरती त्यांनी आपले मत व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून प्रमुख वक्ते जगदिश खैरलिया ह्यांनी संवादाला सुरुवात केली. २००५ ला कचरावेचक महिलांन बरोबर प्रत्येक्ष कामाला सुरुवात त्यांनी स्वतः केली. संपूर्ण महाराष्ट्रातील किंवा राज्याबाहेरील राज्यात अनेक भागात रोजगार नाही, दुष्काळ मोठ्या प्रमाणात, दुष्काळ आपत्ती, रोजी रोटी नाही अनेक सोयीसुविधा रोजगाराचे उपलब्ध नसल्यामुळे अनेक राज्यातून अनेक विभागातून लोक महाराष्ट्रात येतात रोजगार बघतात. कोणी रेल्वे स्टेशनच्या बाजूला, कोणी पुथपात, तर कोणी ब्रिजच्या खाली, कोणी डम्पिंग च्या बाजूला कोणी आश्रमाच्या बाजूला राहून आपला रोजगार मिळवतात आणि त्यामुळे हे इथली परिस्थिती देखील बदलताना दिसतो. २००४ मध्ये व्यवस्थापनाचे नियम आलेले आहेत. पर्यावरण रक्षण कसे केले जाते. हि देखील माहिती पुरविली जाते. विकासाच्या कामाने सामान्य नागरिकांना अधिकार नाही. अनेक मोठमोठे उद्योगधंदे उभे राहत आहेत. अनेक लोकांना रोजगार मिळत नाही. रोजगार मिळाला तरी त्याचं मानधन देखील त्यांना मिळत नाही. पगारासाठी झटावे लागते. विकासाची कामे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला दिसतात पण सामान्य नागरिकांना त्यांचा कोणत्याही प्रकारे अधिकार किंवा कोणत्याही समाजाच्या नाही, त्यांना कुठल्याही प्रकार त्याच्यामध्ये सहभाग होता येत नाही. त्याच्यामुळे रोजगाराचा मार्ग या कचरावेचकांनी शोधावा असे. अनेक रोजगार उपलब्ध करू शकतो. अनेक संस्थांच्या माध्यमातून जसे अगरबत्ती, मेणबत्ती, टेलर काम शिवणकाम, अशा अनेक उपक्रमातून ह्या मुलांसाठी साठी रोजगार आपण करू शकतो जर आपण एकजूट केली तर अनेक काम हीच टीएमसीच्या मार्फत देखील आपण करू शकतो.
कचरावेचकांच्या पुढील प्रमाणेमागण्या आहेत. त्यातील काही मागण्या.
१) कचरावाचकांच्या वर्गीकरणात सहकार्य करावे.
२) कचरावेचकांना ओळखपत्र द्यावे.
३) कचरावेचकाना पर्यावरण मध्ये रोजगार मिळवून द्यावा.
४) रेशन कार्ड, धान्य पुरवठा करावा.
५) आरोग्यसेवा पुराव्यात मुलांना
६) शैक्षणिक सुविधा व शिष्यवृत्ती मिळावे.
७) वयोवृद्धांना पेन्शन सुविधा उपलब्ध करावे.
८) डंपिंग राऊंडवर वर्गीकरणाच्या कामांमध्ये या महिलांना काम मिळावे.
९) ज्या ठिकाणी महिला कचरावेचतात त्याच जागी कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी जागा उपलब्ध करावे.
१०) त्या ठिकाणी शौचालय, पिण्याचे पाणी, प्रत्यक्षिक उपहारगृह व प्राथमिक पेटी देखील उपलब्ध व्हावी.
११) त्यांच्यासाठी सुरक्षा रक्षक सुविधा उपलब्ध करावेत.
१२) कचरा वर्गीकरणासाठी शेड उपलब्ध करून द्यावे.वर्गीकरणात मिळणारा पैसा देखील त्यांना मिळावा.
१३) शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना आधार कार्ड, जात वैधता, दाखला, जात प्रमाणपत्र, बँकेचे खाते अशा अनेक शासकीय योजनेतून त्यांना आणि खाते उपलब्ध करून द्यावे असे देखील त्यांनी आवाहन केलेले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन नियोजन अप्रतिम व आजच मला देखील माहीत झालं की १ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय कचरावेचकदिन म्हणून साजरा केला जातो.