जनअंदोलोंनोका राष्ट्रीय समन्वय - Napm ठाणे जिल्हा

  • Home
  • India
  • Thane West
  • जनअंदोलोंनोका राष्ट्रीय समन्वय - Napm ठाणे जिल्हा

जनअंदोलोंनोका राष्ट्रीय समन्वय - Napm ठाणे जिल्हा जन आंदोलनोका राष्ट्रीय समनव्यक

भारत जोडो अभियान आणि समविचारी संघटना संस्थे तर्फे ठाण्यात दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता डॉ. काशिनाथ घ...
07/11/2024

भारत जोडो अभियान आणि समविचारी संघटना संस्थे तर्फे ठाण्यात दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे लोकशाही संमेलन लोकशाही, संविधान आणि मताधिकार. सोबतच लोकशाही जलसा सादरकर्ते शाहीर संभाजी भगत दादा यांच्या सहकलाकार सहित जोरदार असा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते -: योगेंद्र यादव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रिय संयोजक, भारत जोडो अभियान, प्रमुख मार्गदर्शक -: उल्का महाजन, संयोजक, भारत जोडो अभियान, डॉ. संजय मंगला गोपाळ राष्ट्रीय सचिव, भारत जोडो अभियान उपस्थित होते.

महाराष्ट्राने नेहमीच देशाच्या राजकरणाला दिशा दाखवली आहे. इथे सुरु केलेल्या रोजगार हमी, महिला आरक्षण सारख्या योजना केंद्र सरकारने देशभरात चालवल्या. बळाने नाही तर नीतीने सरकार चालवण्याचा वस्तुपाठ महाराष्ट्राने देशाला घालून दिला या बद्दल देशभरात महाराष्ट्राचे नाव आदराने घेतलं जायचं पण गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचा राजकारणाने अशी काय पलटी मारली की आज महाराष्ट्र कुनीति आणि कुकर्माचे मॉडेल बनत आहे हे फार चिंताजनक आणि दुःखदायी आहे, असे घणाघाती आरोप भारत जोडो अभियान चे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी ठाण्यात भारत जोडो अभियानातर्फे आयोजित केलेल्या लोकशाही, संविधान आणि मताधिकार संमेलनात बोलताना केले. ते पुढे म्हणाले, खोट्या राष्ट्रवादाचा आव आणणारे आणि धर्माच्या, जातीच्या नावावर दंगली घडवून आणणारे खरे देशद्रोही आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या फोडा आणि राज्य करा या धोरणाला चपराक लगावून त्यांना कुबड्यांचा आधार घेऊन सत्तेवर येण्यास भाग पाडण्यात महाराष्ट्राने मोठी भूमिका बजावली होती. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुजाण मतदारांनी या देशद्रोही आणि सत्तेचा गैरवापर करुन आलेल्या सरकारला धडा शिकवावा आणि त्यांना सत्तेतून पायउतार व्हायला भाग पाडावे.

भारत जोडो अभियानाच्या महाराष्ट्र राज्य संयोजक उल्का महाजन यांनी आपल्या भाषणात सरकारच्या लाडकी बहीण या योजनेवर जोरदार टीका करत म्हटलं की महिलांना पैशाचं आमिष निवडणुकीसाठी दाखवणारे सरकार महिलांच्या सुरक्षितते बाबत निकामी ठरले आहे हे राज्यात सतत घडणाऱ्या महिलावरील अत्याचार आणि त्यात सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा हात आणि त्यांना आरोप मुक्त करण्यात सरकारचा पुढाकार यावरुन स्पष्ट दिसून येतं. शिवाजी महाराजांचा पुतळ्यातही भ्रष्टाचार करणारे हे सरकार सामाजिक, आर्थिक बाबतीत संपूर्णपणे पराभूत झाले आहे.

भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय सचिव डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी सरकारच्या सर्रास खोटेपणावर झोड उठवताना म्हटले की सरकारवर टीका करणाऱ्या आणि भारत जोडो अभियानात सामील असलेल्यांना अर्बन नक्षल, अराजक माजवणारे असे ठरवून संविधानाने दिलेल्या विचार आणि भाषण स्वातंत्र्याचा अपमान करण्याचे काम फडणवीस करत आहेत. सर्रास खोटे आरोप दाबून करा हीच शिकवण भाजप आणि संघातून मिळते आणि त्याच्याच आधारे हे बेईमानी सरकार चालवले जात आहे. या निवडणुकीत त्यांना पाडून लोकशाहीचा सन्मान करण्याचा पण मतदारांनी केला आहे.

या संमेलनात शाहीर संभाजी भगत आणि सहकाऱ्यांनी संविधानाचा जलसा जोशात सादर केला. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास ठाणेकरांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संयोजक राजेंद्र चव्हाण, मुक्ता श्रीवास्तव, जगदीश खैरालिया, वंदना शिंदे, विशाल जाधव, रवि घुले, अजय भोसले आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

*येताय ना मग !**सारे जग महात्मा गांधीसमोर नतमस्तक होत आहे! आपणही घेऊयात गांधींजी पासून प्रेरणा!!* *महात्मा गांधीजींना अभ...
01/10/2024

*येताय ना मग !*

*सारे जग महात्मा गांधीसमोर नतमस्तक होत आहे! आपणही घेऊयात गांधींजी पासून प्रेरणा!!*

*महात्मा गांधीजींना अभिवादन करून शांतता यात्रा काढण्यात येणार आहे तरी, सर्व न्याय व शांतता प्रिय ठाणेकर नागरिकांनी सहभागी व्हावे.*

*दि. २ ऑक्टोबर २०२४ सायं. ४ः३० वा.*

*जागा: महात्मा गांधी उद्यान, तलावपाळी, शिवाजी पथ, ठाणे (प)*

आयोजक -: विविध समविचारी संस्था - संघटना

*अधिक माहितीसाठी संपर्क -: जगदीश खैरालिया - ९७६९२८७२३३ / अजय भोसले -: ८१०८९४९१०२*

फेसबुक -:
https://www.facebook.com/samatavicharprasaraksanstha?mibextid=ZbWKwL

वेबसाईट -:
https://samatavichar.org/

यश श्रमिक जनता संघाचे व लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचेठाणे प्रादेशिक मनोरूग्णालय येथे एप्रिल २००८ च्या आगोदर १८७ कायमस्वरूपी सफा...
20/09/2024

यश श्रमिक जनता संघाचे व लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचे

ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालय येथे एप्रिल २००८ च्या आगोदर १८७ कायमस्वरूपी सफाई कर्मचारी सेवेत होते. शासनाने रूग्णालयातील कायमस्वरूपी सफाई कामगारांना इतरत्र समावून घेऊन कंत्राटदारां मार्फत सुमारे शंभर सफाई कामगारांना तुटपुंजे वेतनावर राबविले जात होते. गेली पाच वर्षे विशेष भत्त्याची दर सहा महिन्यांनी वाढणारी रक्कम कामगारांना पगारात दिली जात नव्हती. श्रमिक जनता संघ युनियनच्या वतीने कोर्टात धाव घेतल्यानंतर मा. ठाणे औद्योगिक न्यायालयाने ११ जून २०२४ रोजी केस नं युएलपी १२६ / २०२१ मध्ये किमान वेतन अधिनियम नुसार वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. परंतु मेंटल हॉस्पिटल प्रशासनाने आणि ठेकेदाराने कोर्टाचे आदेश पाळले नाही म्हणून श्रमिक जनता संघ युनियनने व कर्मचाऱ्यांनी १३ ऑगस्ट पासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली. प्रशासनाने हलचाली चालू झाल्या मीटिंग २ ते ३ झाले पण फक्त आश्वासन देत असल्यामुळे हे आंदोलन युनियनच्या अध्यक्षा मेधा पाटकर यांच्या मार्गदर्शनाने आंदोलन तीव्र करण्यात आले. तसेच मेधा ताई नी देखील आरोग्य मंत्री, उपसंचालक, कामगार आयुक्त तसेच आरोग्य संचालक मुंबई यांच्याशी देखील संवाद साधला व न्याय मिळुन देऊ असे सांगितले पण ताईने दिलेला शब्द कामगारांनी पाळला व अखेर ९ सप्टेंबर ला न्याय मिळाला हा न्याय एकजुटीचा, कर्मचाऱ्याच्या विचाराच्या युनियनच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून झाले.

वेळेत न्याय मिळत नसल्याने ३० ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन देखील करण्यात आले जिल्हाधिकारी व ठाण्याचे पालकमंत्री मा श्री शंभूराज देसाई यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. व ठेकेदाराला समज देखील देण्यात आली होती.

काही वेळेसाठी वाटत होते की शासनच काही दिवसात ठेकेदार पद्धतीने चालणार आहे की काय ? हा प्रश्न मनात येऊन राहतो.

ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कर्मचारी साखळी उपोषणाच्या २८ व्या दिवशी किमान वेतन अधिनियमा नुसार वेतन मिळावण्यात यशस्वी झाले. त्यामुळे २८ दिवस सुरु असलेले साखळी उपोषण आंदोलन श्रमिक जनता संघाने स्थगित केले आहे. ९ सप्टेंबर रोजी किमान वेतन अधिनियमा नुसार कामगारांच्या बॅंक खात्यात वेतन जमा झाल्या नंतरच कामगारांच्या सहमतीने श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया व उपाध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी १३ ऑगस्ट पासून सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. युनियनच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांनी लढाऊ कामगारांचे अभिनंदन केले. ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीमती रानडे यांनी उपोषणकर्त्यांना फळाचा रस पाजून उपोषण सोडवले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी सांगितले की, किमान वेतन अधिनियमा नुसार वेतन अदा केले आहे. आणि किमान वेतनाच्या फरकाच्या रकमेचा प्रस्ताव वरिष्ठांकडे मंजुरी साठी पाठवले आहे. तेही लवकरच मिळेल त्यामुळे आता आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करत आहे. रूग्णालय प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने पाच वर्षाच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला असल्याचे युनियनचे सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी सांगितले आहे.

अठ्ठावीस दिवस बेमुदत साखळी उपोषणाचा लढा देत शेवटी आता किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू करून घेण्यात यश मिळाले आहे. २८ दिवसांत रोज चार सफाई कामगार चौवीस तास उपोषण करत होते. आंदोलनात जवळजवळ सर्व सफाई कामगार सहभागी झाले होते. महिला कर्मचाऱ्यांनी आंदोलनात उत्साहाने सहभाग घेतला.

आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युनियनच्या अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, स्वराज अभियानचे सुभाष लोमटे, एन.ए.पी.एम व समता विचार प्रसारक संस्थेच्या मीनल उत्तूरकर, धर्म राज्य पक्षाचे नितीन देशपांडे, अन्न अधिकार अभियानच्या मुक्ता श्रीवास्तव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदनाताई शिंदे, अखिल भारतीय छावा संघटनेच्या रितू जतिंदर सेंखों, माजी नगरसेवक विकास रेपाळे, सुहास देसाई, भारत जोडो अभियानचे राजेंद्र चव्हाण, युनियनचे सचिव सुनील कंद, अजय भोसले, संघटक सुनील दिवेकर, बहुजन विकास संघाचे नरेश भगवाने, नरेश बोहित, घर बचाओ घर बनाओ आंदोलनचे नंदू शिंदे, पुजा पंडित, श्रमजीवी कामगार संघटनेचे किरण कांबळे म्युज फाउंडेशन चे अध्यक्ष निशांत बंगेरा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजेश सौदे, nss चे माजी विद्यार्थी श्रेया कोलवणकर, साहिल नदाफ, मुस्तफा पिंजारी आदींनी आंदोलनाला पाठींबा देऊन कामगारांचे मनोबल वाढवले. श्रमिक जनता संघाचे ठाणे महानगरपालिका व कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध खात्यांचे कामगार प्रतिनिधी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन मनोरूग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिला.

श्रमिक जनता संघाच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलन यशस्वी होण्यासाठी युनियनच्या संघटक, अनिता कुमावत, शर्मिला लोगडे, दीनानाथ देसले, महेश निचिते, संजय सेंदाणे, पुष्पा भद्रे, सुविधा बांदल, सोनी चौहान, किशोर खर्डीकर, किशोर शिराळ, गीता झेंडे, रंजना मोरे आणि नंदकुमार गोतारणे आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी विशेष श्रम घेतले.

श्रमिक जनता संघा तर्फे कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी दि.१८ जुलै २०२४ रोजी दुपारी २ वा चिंतामणी चौक, तलावपाली, जांभळ...
21/07/2024

श्रमिक जनता संघा तर्फे कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी दि.१८ जुलै २०२४ रोजी दुपारी २ वा चिंतामणी चौक, तलावपाली, जांभळी नाका, येथे जमून ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर *" *न्याय दिंडी"* दुपारी ४ वा काढण्यात आली होती ह्या न्याय दिंडीत, पाणी पुरवठा विभाग, मलनिसरणी विभाग, यांत्रिक विभाग, ड्रेणेज विभाग, रस्ते साफसफाई विभाग, शिक्षण विभाग, रेल्वे कर्मचारी असे अन्य विभागातील कामगार मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. कामगारांना अनेक वर्ष पासून ठेकेदारा कडून फक्त कामे करून घेतली जातात पण कोणते सोय सुविधा, वेतन, आरोग्य सुविधा, सुरक्षतेची सुविधा, सुट्टी असे अनेक प्रकार त्यांना काहीही न देता फक्त काम करून घेतले जात होते त्यासाठी श्रमिक जनता संघा तर्फे आषाढी एकादशी निमित्ताने महापालिकेला साकड घालण्यासाठी न्याय दिंडी काढून न्याय मागण्यासाठी मोठ्या संख्येने कामगारांनी सहभाग घेऊन आपला लढा उभा केला होता. ह्या लढ्याच्या माध्यमातून अनेक प्रश्न देखील सुटले व अनेक प्रश्नांवर चर्चा देखील चालू झाली व कामगारांना दिलासा देखील मिळतोय.

कामगारांच्या मागण्या खालील प्रमाणे.
१) आत्यावश्यक सेवेतील नियमित स्वरुपाची बारामाही सतत चालणारी कामे करणार्‍या कंत्राटी कामगारांना कायम कामगारां प्रमाणे वेतन, भत्ते व सोयी सुविधा लागु करा.
२) ठाणे महापालिका शाळेतील सफाई कामगार व अन्य खात्यातील कार्यरत कर्मचारी यांना वयोमानानुसार कमी करण्यात आलेले किंवा मरण पावलेल्या कामगारांना उपदान (Gratuity) ची रक्कम तात्काळ अदा करण्यात यावी.
३) शिक्षण विभागातील कंत्राटी सफाई कामगारांना सार्वजनिक सुट्टीच्या काळात उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टीत काम द्या / वेतन द्या.
४) कंत्राटी कामगारांना नियमितपणे वेळेवर कायदेशीर वेतन, वेतनस्लिप, गणवेश, ओळखपत्र, सुरक्षिततेची साधने द्या, पावसाळ्यात रेनशूट, गमबूट आदी वाटप करा.
५) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यावर कामगारांना सुट्टी किंवा जादा कामाचा भत्ता मासिक वेतनात अदा करा.
६) ड्रेनेज लाइन चेंबर आदि सफाई करणाऱ्या जेटिंग गाड्यांवरील १८ सफाई कर्मचारी व वाहन चालकांना रोजगार दया.
७) ठा. म. पा. उपायुक्त मुख्यालय यांच्या दालनात १ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी करावी.
८) कायमस्वरुपी व अत्यावश्यक सेवेत कंत्राटी पध्दत बंद करुन सर्व कार्यरत कंत्राटी कामगारांना महापालिकेच्या सेवेत सामावुन घ्यावे. व कायम स्वरुपी कामगारांच्या सारखे वेतन व भत्ते लागु करा.
९) The Prohibition of Employment as Manual Scavengers and Their Rehabilitation Act 2013 या कायद्याची अंमलबजावणी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने इमानेइतबारे करावे. तसेच ठाणे महानगरपालिका हद्दीत एसटीपी टाकी, मलवाहिनी, सीवर चैम्बर्स सफाई करतांना मरण पावलेल्या सफाई कामगारांच्या आश्रितांचे सामाजिक न्याय आधारित पुनर्वसन करावे.

कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी दि.१८ जुलै २०२४ रोजी दुपारी २ वा चिंतामणी चौक, तलावपाली, जांभळी नाका, येथे जमून ठाणे ...
17/07/2024

कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी दि.१८ जुलै २०२४ रोजी दुपारी २ वा चिंतामणी चौक, तलावपाली, जांभळी नाका, येथे जमून ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर *" *न्याय दिंडी"* कार्यक्रम आहे. दुपारी ४ वाचे सुमारास ठामपा आयुक्त यांना श्रमिक जनता संघाचे शिष्टमंडळ भेटून मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे.

जगदीश खैरालिया,
महासचिव, श्रमिक जनता संघ
9769287233

आज शनिवार, दि. ४ मे २०२४ रोजी संध्याकाळी ५.३० वा. मेधा पाटकर नर्मदा नवनिर्माण अभियान व विद्यादान सहाय्यक मंडळ या संस्थेल...
03/05/2024

आज शनिवार, दि. ४ मे २०२४ रोजी संध्याकाळी ५.३० वा. मेधा पाटकर नर्मदा नवनिर्माण अभियान व विद्यादान सहाय्यक मंडळ या संस्थेला अत्रे कट्ट्याचा “कृतज्ञता पुरस्कार” देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे तरी सर्व ठाणेकरानी अवश्य उपस्थित रहा !!!

हिमालयाच्या पर्यावरणरक्षणासाठी,लडाखला राज्याचा दर्जा देऊन तेथे सहावी अनुसूची लागू करण्यासाठीच्या लडाखी जनतेच्या जनआंदोलन...
22/03/2024

हिमालयाच्या पर्यावरणरक्षणासाठी,
लडाखला राज्याचा दर्जा देऊन तेथे सहावी अनुसूची
लागू करण्यासाठीच्या
लडाखी जनतेच्या जनआंदोलनाला
आणि *सोनम वांगचुक* यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी,
*२३ मार्चला, शहीद भगतसिंग शहादत दिनी,* *दिवसभराचे लाक्षणिक उपोषण.*
आपणही जिथे असाल तिथे उपोषण करून आपला पाठिंबा व्यक्त करा.
हा पाठिंबा समाज माध्यमात जाहीर करा. आम्हालाही कळवा.
*मेधा पाटकर व साथी*
*जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय*
_संपर्क : सिरत सातपुते - 8149673929_
_सुजय मोरे - 9867680006_

मी हे करणार. तुम्ही?

सोमवार, दि. ०५ जून २०२३ रोजी पर्यावरण दिवस राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरी विरोधी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि सदर विना...
06/06/2023

सोमवार, दि. ०५ जून २०२३ रोजी पर्यावरण दिवस राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरी विरोधी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि सदर विनाशकारी रिफायनरी व पेट्रो केमिकल प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कार्यालयावर निदर्शने करून साजरा करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय, कामगार, शेतकरी, युवक, विद्यार्थी, शिक्षक व महिला संघटनांचे प्रतिनिधी तसेच पर्यावरण अभ्यासक आणि बारसू पंचक्रोशीतील रिफायनरी विरोधी आंदोलक निदर्शनात सहभागी झाले. जिल्हाधिकारी, ठाणे यांना भेटून प्रतिनिधी मंडळाने निवेदन दिले व बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द व्हावा आणि कोकणातील जैव विविधता बाधीत होणार नाही असे पर्यायी ऊर्जा स्रोत आणि उद्योग निर्माण करावेत अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला करण्यात आले.

०१ मार्च २०२३ आंतरराष्ट्रीय कचरावेचक दिनानिमित्त स्त्री मुक्ती संघटना, परिसर सखी विकास संस्था, व नूतन को - ऑपरेटिव्ह यां...
02/03/2023

०१ मार्च २०२३ आंतरराष्ट्रीय कचरावेचक दिनानिमित्त स्त्री मुक्ती संघटना, परिसर सखी विकास संस्था, व नूतन को - ऑपरेटिव्ह यांचा संयुक्त विध्यमाने निर्धार मेळावा अर्थात रोजगार उपलब्ध ह्या विषयावर संवाद साधण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्रमिक जनता संघचे सरचिटणीस जगदीश खैरलिया, उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती दिक्षित देव सीएसआर एक्झिटिव्ह बिसलरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, श्री सुरेंद्र जडयार शिधावाटप अधिकारी व स्त्री मुक्ती संघटनेचे अध्यक्ष वृषाली मगदूम, नूतन को - ऑपरेटिव्हचे अध्यक्षा मंगला दांडगे, परिसर सखी विकास संस्थाची अध्यक्षा रुक्मिणी पॉल आणि इतर सहकारी व कर्मचारी उपस्थित होते. वी नीड यु संस्थेच्या अध्यक्षा लतिका सुमो, समता विचार प्रसारक संस्थेचे सचिव अजय भोसले, सहसचिव अनुजा लोहार, म्युज फाऊंडेशन चे सदस्य मोहित हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून सावित्रीबाईंची ओवी म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह्यांच्या परिचय करून देण्यासाठी संगीता ताईने केली. परिसर सखी विकास संस्थेच्या अध्यक्षा रुक्मिणी पॉल ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कचरावेचून, कचऱ्यातूनच आपली निर्मिती करताना त्यांनी आपल्याच मुलीला ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करत त्यांचे शिक्षण पूर्ण केले. पूर्वी आजी - आजोबा व अगोदरचे काही व्यक्ती अगोदर मार्केटमध्ये कचरा हा माल म्हणून विकला जात होता व त्या बदल्यात मोबदला देखील मिळत होता. आणि कचरावेचकांनीच कच्चा माल म्हणून कचरा मार्केटमध्ये आणला. तेव्हा हे मार्केट वाले अनेक मोबदला उपलब्ध करून देत होते नंतर हे मार्केट वाले कुठे गेले होते. कचरा पुनर्निंबित करणे हा काय उपाय आहे का ? त्यांना रोजगार उपलब्ध करावे ? अनेक प्रवक्ते सफाईकर्मचारी व कचरावेचक कर्मचाऱ्यांचे नाव घेऊन मोठं मोठ्याली भाषण करून आश्वासन देतात त्यात त्यांना हिणवले जाते कचरावेचक, चोर, गुन्हेगार, व अपशब्दाने देखील संबोधले जातात. औरंगाबाद येथील घटना सांगितली सकाळी ०७ : ०० ते रात्री ९ : ०० पर्यंत कचरा दिला जातो पुन्हा रात्री देखील अंधारात शोधावा लागतो. तो कचरापुन्हा गोळा करण्यासाठी रात्री ०९ : ०० ते सकाळी ०७ :०० वाजेपर्यंत हा कचरा गोळा केला जातो पण अनेकांना कचरा मिळत नाही व कचरा ओळखण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक विभागात अनेक लाईट नसणे, हॉटेल्स मध्ये जाऊन विनंती करणे, जमा करणे, मॉल मध्ये जावे लागतात. शासनाचे नियम. काही ठिकाणी तर चोर म्हणून देखील त्यांच्यावर आरोप केला जातो. त्यांना पोलिसात कोठडी टाकल्या जातात. त्यांच्यावर बेकायदेशीरपणे कोणतेही कलमे लागू करतात व त्याची अंमलबजावणी केली जाते ह्याच मार्गातून मुलं पुढे व्यसनाकडे वळतात, शिक्षण, रोजगार नाही, बालविवाह, आंतरजातीय विवाह, प्रेम विवाह अशा अनेक समस्यांना बळी पडतात व अनेक समस्यांना बळी पडतात व त्यातून नवीन उत्पत्ती तयार देखील त्याच पद्धतीने होते लोक अनेक भाषणामध्ये बोलतात की आम्ही हे उपक्रम करू. या सुविधा त्या सुविधा करू पण जे बोलतात त्यांना लावून धरत नाहीत. जमत नसेल तर सरकार सोडा असे देखील त्या म्हणाल्या. आशा कचरावेचक महिलांना व इतरांना जर सार्वजनीक सामाजिक संस्था एकत्र काम करीत असेल व त्याना मदत करीत असेल, तर सरकार काय काम करत व कोणासाठी ? हा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले. एक व्यक्ती जर दिवसाला ५० किलो कचरा गोळा करत असेल तर १५०० महिला यांनी जमा केले तर तीन टन च्या आसपास हा कचरा जमा केला जातो आणि तो विक्रीस देखील उपलब्ध केला जातो सामाजिक संस्थेतून मिळालेल्या मदतीने अनेक कचरावाचकांची मुले हॉटेल मॅनेजमेंट, शिक्षक, mpsc परीक्षा तयारी व इतर कामासाठी सहभाग तसेच अनेक कंपन्यांमध्ये त्यांना नोकरी देखील मिळतात व त्या नोकरीतून मिळालेला संधीचं सोनं करतात आणि मिळालेल्या पैशातून किंवा पगारातून या संस्थेला देखील पुन्हा ते निधीतून आपलं सामाजिक कर्तव्य बजावत असतात.

लतिका सुमो ह्यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाल्या की, कचरावेचक महिलांमुळे कचऱ्याचे विघटन, वर्गीकरण होते तेही कोणतेही मानधन न घेता या कचरा वेगळा करण्याचे काम महिला करत असतात. कचरावेचक व सफाई कर्मचारी हे डॉक्टरा पेक्षाही मोठा असतो, कारण स्वच्छता हे लोकं ठेवतात. आणि त्याच्यामुळेच कोणतेही रोगराई पसरण्यास आळा बसतो. " श्रमाला प्रतिष्ठा नाही असे महात्मा गांधीजी म्हणतात " . "शिक्षणाला हात द्या भविष्याला साथ द्या" अशा अनेक प्रश्नांवरती त्यांनी आपले मत व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून प्रमुख वक्ते जगदिश खैरलिया ह्यांनी संवादाला सुरुवात केली. २००५ ला कचरावेचक महिलांन बरोबर प्रत्येक्ष कामाला सुरुवात त्यांनी स्वतः केली. संपूर्ण महाराष्ट्रातील किंवा राज्याबाहेरील राज्यात अनेक भागात रोजगार नाही, दुष्काळ मोठ्या प्रमाणात, दुष्काळ आपत्ती, रोजी रोटी नाही अनेक सोयीसुविधा रोजगाराचे उपलब्ध नसल्यामुळे अनेक राज्यातून अनेक विभागातून लोक महाराष्ट्रात येतात रोजगार बघतात. कोणी रेल्वे स्टेशनच्या बाजूला, कोणी पुथपात, तर कोणी ब्रिजच्या खाली, कोणी डम्पिंग च्या बाजूला कोणी आश्रमाच्या बाजूला राहून आपला रोजगार मिळवतात आणि त्यामुळे हे इथली परिस्थिती देखील बदलताना दिसतो. २००४ मध्ये व्यवस्थापनाचे नियम आलेले आहेत. पर्यावरण रक्षण कसे केले जाते. हि देखील माहिती पुरविली जाते. विकासाच्या कामाने सामान्य नागरिकांना अधिकार नाही. अनेक मोठमोठे उद्योगधंदे उभे राहत आहेत. अनेक लोकांना रोजगार मिळत नाही. रोजगार मिळाला तरी त्याचं मानधन देखील त्यांना मिळत नाही. पगारासाठी झटावे लागते. विकासाची कामे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला दिसतात पण सामान्य नागरिकांना त्यांचा कोणत्याही प्रकारे अधिकार किंवा कोणत्याही समाजाच्या नाही, त्यांना कुठल्याही प्रकार त्याच्यामध्ये सहभाग होता येत नाही. त्याच्यामुळे रोजगाराचा मार्ग या कचरावेचकांनी शोधावा असे. अनेक रोजगार उपलब्ध करू शकतो. अनेक संस्थांच्या माध्यमातून जसे अगरबत्ती, मेणबत्ती, टेलर काम शिवणकाम, अशा अनेक उपक्रमातून ह्या मुलांसाठी साठी रोजगार आपण करू शकतो जर आपण एकजूट केली तर अनेक काम हीच टीएमसीच्या मार्फत देखील आपण करू शकतो.

कचरावेचकांच्या पुढील प्रमाणेमागण्या आहेत. त्यातील काही मागण्या.

१) कचरावाचकांच्या वर्गीकरणात सहकार्य करावे.
२) कचरावेचकांना ओळखपत्र द्यावे.
३) कचरावेचकाना पर्यावरण मध्ये रोजगार मिळवून द्यावा.
४) रेशन कार्ड, धान्य पुरवठा करावा.
५) आरोग्यसेवा पुराव्यात मुलांना
६) शैक्षणिक सुविधा व शिष्यवृत्ती मिळावे.
७) वयोवृद्धांना पेन्शन सुविधा उपलब्ध करावे.
८) डंपिंग राऊंडवर वर्गीकरणाच्या कामांमध्ये या महिलांना काम मिळावे.
९) ज्या ठिकाणी महिला कचरावेचतात त्याच जागी कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी जागा उपलब्ध करावे.
१०) त्या ठिकाणी शौचालय, पिण्याचे पाणी, प्रत्यक्षिक उपहारगृह व प्राथमिक पेटी देखील उपलब्ध व्हावी.
११) त्यांच्यासाठी सुरक्षा रक्षक सुविधा उपलब्ध करावेत.
१२) कचरा वर्गीकरणासाठी शेड उपलब्ध करून द्यावे.वर्गीकरणात मिळणारा पैसा देखील त्यांना मिळावा.
१३) शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना आधार कार्ड, जात वैधता, दाखला, जात प्रमाणपत्र, बँकेचे खाते अशा अनेक शासकीय योजनेतून त्यांना आणि खाते उपलब्ध करून द्यावे असे देखील त्यांनी आवाहन केलेले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन नियोजन अप्रतिम व आजच मला देखील माहीत झालं की १ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय कचरावेचकदिन म्हणून साजरा केला जातो.

'नफरत छोडो,संविधान बचाओ' यात्रेसाठी उल्हासनगरात कायद्याने वागा लोकचळवळीने पुढाकार घेतला. सामाजिक कार्यकर्ता शिवाजी रगडे ...
06/12/2022

'नफरत छोडो,संविधान बचाओ' यात्रेसाठी उल्हासनगरात कायद्याने वागा लोकचळवळीने पुढाकार घेतला. सामाजिक कार्यकर्ता शिवाजी रगडे यांनी स्थानिक पातळीवर यात्रेचं नेतृत्व केलं. या यात्रेत शाळकरी मुले, युवा वर्ग, असंघटित कामगार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता. जनआंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक संजय मंगला गोपाळ यांनी सम्राट अशोक नगरातील संविधान चौकात यात्रेला संबोधित केलं.

https://youtu.be/6IvcuV-mgv4

*MediaBharatNews*
मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम

Address

Thane West

Telephone

+918104471652

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जनअंदोलोंनोका राष्ट्रीय समन्वय - Napm ठाणे जिल्हा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to जनअंदोलोंनोका राष्ट्रीय समन्वय - Napm ठाणे जिल्हा:

Share

Category