30/05/2026
**प्रश्न:** ...सरकारचे प्रमुख म्हणून तुमचं काय म्हणणं आहे?
**देवेंद्र फडणवीस:** बघा, सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे. सरकारने वारंवार निर्णय घेतलाय. प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली, त्या त्या वेळी सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतोय आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल. आमचं सरकार सर्व समाजाकरता सकारात्मक काम करणारं सरकार आहे. आम्ही समाजांना एकमेकांपुढे आणून भांडण करत नाही. सगळ्यांचं भलं कसं होईल, हा प्रयत्न करतो आणि विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात मी पुन्हा एकदा सांगतो, जेवढे निर्णय मी घेतले आणि शिंदे साहेबांनी घेतले, एवढे इतिहासात कधी झाले नाहीत आणि पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू. फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल. त्या निर्देशांचा अवलंब न करता जर एखादा निर्णय घेतला, तर त्यातनं केवळ प्रसिद्धी मिळेल, पण तो निर्णय टिकणार नाही. त्यामुळे संविधान आणि न्यायालयाचे निर्णय यांच्या कसोटीवर ज्या ज्या निर्णय आम्हाला घेता येतील, त्याच्या कसोटीवर खरे ठरणारे जे जे निर्णय असतील, ते सगळे निर्णय आम्ही घेऊ.
**प्रश्न:** जरांगेंचं आंदोलन सुरू झालं की ओबीसी समाजामध्ये भीतीचं वातावरण असतं, तुम्ही त्यांना काय सांगाल?
**देवेंद्र फडणवीस:** मी असं स्पष्टपणे सांगतो, एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं...